Thursday 15 February 2024

 गझवा-ए-हिंद


आधारकार्ड बनवताना माझ्या सर्व बोटांचे ठसे आणि डोळ्याच्या बुबुळांचे (आयरिस) ठसे घेण्यात आले.

माझे हे  रेकॉर्ड भारत सरकारकडे जमा आहे.  आज भारत सरकार एका सेकंदात माझ्या बोटांच्या ठशांनी मला शोधू शकते. चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आता खूप विकसित झाले आहे. तुमचा छोटा स्मार्टफोन तुमचा चेहरा ओळखतो आणि आपोआप चालू होतो. चीन आणि इस्रायल सारख्या देशांनी त्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचे चेहरे त्यांच्या डेटा बेसमध्ये नोंदवले आहेत.  हे सॉफ्टवेअर 10 लाख लोकांमध्ये तुमचा चेहरा एका सेकंदापेक्षा कमी वेळात ओळखतो.

जेव्हा तुम्ही हातात पेट्रोल कॅन घेऊन बस जाळायला निघाल तेव्हा स्थानिक पोलिस स्टेशनचे ड्रोन तुमच्यावर उडत असतील. ते तुमचा चेहरा टिपतील आणि  तुमचा डेटा दंगलखोर म्हणून नॅशनल क्राइम रजिस्टरमध्ये नोंदवतील.  त्यानंतर तुम्हाला भारत सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, उदाहरणार्थ गहू, तांदूळ आणि साखरेची २ रुपये किलोची सबसिडी तुमच्या खात्यात येणार नाही, तुम्हाला मुद्रा कर्ज मिळणार नाही, एलपीजीची सबसिडी तुमच्या खात्यात येणार नाही, तुम्ही सरकारी नोकरीसाठी अपात्र ठराल, तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही, तुमच्या देशातल्या हालचालींवर मर्यादा येतील, पासपोर्ट होणार नाही, सौदी, कतार आणि दुबई तुम्हाला व्हिसा देणार नाही.थोडक्यात जिथे जिथे वैयक्तिक  पडताळणी करावी लागते, त्यात तुम्ही नापास व्हाल.

त्यामुळे गझवा-ए-हिंदचे स्वप्न सोडा, तुमची कागदपत्रे पूर्ण करा आणि तुमचे नाव NRC मध्ये नोंदवा आणि एक सन्माननीय नागरिक बना आणि सर्व अनुदानाचा लाभ  घ्या, नाहीतर ते दिवस दूर नाहीत  जेव्हा हे क्रूर सरकार  तुमचे सिम कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड., पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक एटीएम कार्ड, पासपोर्ट, बँक खाते, रेशनकार्ड इत्यादी सर्व जप्त केले जातील आणि तुम्हाला चेहऱ्याविना निनावी कैदी म्हणून  डिटेन्शन कॅम्प मध्ये ठेवले जाईल, 

त्यामुळे आंदोलन सोडा आणि कागदपत्रे तयार करा. CAA  आला  आहे.  आता NRC आणि NPR  पाठोपाठ येतच आहेत. 


Friday 21 May 2021

मेरे साजन है उसपार.







बंगाली भाषेतले लेखक ' ताराशंकर बंदोपाध्याय ' यांची कादंबरी 'आरोग्य निकेतन ' मधील नायक जिबोन मोशाय नाडी वैद्य आहे. तो रुग्णांची नाडी पाहून आजार सांगतो. त्याला नाडीमध्ये मृत्यूचा आवाज ऐकू येतो. आपल्या स्वत:च्या मृत्यूच्या आवाजाबद्दल बोलतांना तो म्हणतो,  " मृत्यूने पायात पैंजणं  घातली आहेत, सध्या ती शेताच्या बांधावरुन हळू-हळू चालत येत आहे, हळू-हळू पैंजणांचा आवाज मोठा होत चालला आहे..... आता अचानक पैंजणांचा आवाज कमी झालाय, ती (मृत्यु) माझ्या उशाजवळ येऊन थांबली तर नाही...? मृत्यु निशब्द आहे, कदाचित ती मला आपल्या मिठीत सामावून घेणार आहे असं वाटतंय...."

निदा फाजली यांच्या शब्दात....'यहां हर शै मुसाफिर है, सफर में जिंदगानी है।' 

 साहिर लुधियानवी म्हणतात:
संसार की हर शय का इतना ही फ़साना है, इक धुंध से आना है इक धुंध में जाना है।' 

शैलेंद्र यांनी एक गैर फिल्मी गाणं लिहिलंय.... 'चलते चलते थक गया मैं और सांस भी ढलने लगी, तब राह खुद मुझे अपनी बाहों में लेकर चलने लगी।'

मृत्यूचे क्षण इतके सुंदर?  प्राण जात असताना शरीराचं नेमकं काय होत असतं? आणि शरीरातून जीव निघून जातो त्या क्षणानंतर मृतदेहाला अग्नी मिळेपर्यंत त्या निर्जीव शरीराचं काय होत असतं?त्याच्या  मृत्यूचा शोक करावा की देहाला मुक्ती मिळाली म्हणून आनंद मानावा? 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ 
असं जर असेल तर मग मृत्यूचा शोक कशाला मानायचा? मृत्यु म्हणजे पुनर्जन्म. मातेच्या गर्भाशयातून बाळ बाहेर, जगात येतं. गर्भाशय परत रिकामं होतं दुसऱ्या जीवाला जन्म द्यायला. बाळाचा  जन्म होतो आणि नाळ कापली जाते. अगदी तसंच मानवी देहाला देखील एक अदृश्य नाळ  जोडलेली असते, ज्याला चंदेरी नाळ असं नाव दिलंय. Silver Cord.  मृत्यूचा क्षणी ही अदृश्य नाळ तुटते आणि जड देहापासून सूक्ष्म देह वेगळा होतो, पुनर्जन्म घेण्यासाठी. हा देह जड देहाच्या वरतीच घोटाळत असतो, परत आत शिरण्यासाठी परंतु नाळ तुटलेली असल्यामुळे त्याला शिरता येत नाही. आपला जो देह आपल्या डोळ्यांनी दिसतो तो जड देह. या व्यतिरिक्त अजून दोन देह आपल्या भोवती वावरत असतात. सूक्ष्म देह, subtle body, जो स्वप्नावस्थेत सजग असतो. हा सूक्ष्म देह अध्यात्मिक प्रगतीसाठी काम करत असतो.  तिसरा देह म्हणजे ' कारण ' देह. हा तिसरा देह, casual body, सतत जागा असतो आणि हाच देह जों कधीही बदलत नाही. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। त्या त्या जन्मी केलेल्या कर्मानुसार सूक्ष्म देह मात्र बदलत राहतो. मग मुक्ती कुणाला मिळते? 

प्रत्येक देहा भोवती सात कोशाचे आवरण असते. प्राणमय कोश जो रक्तात, आणि हृदयाच्या पोकळीत असतो. हाच तो कोष जो ऑक्सिजन अभावी नाश पावतो. 

अन्नमय कोष हा अन्नावर, पाण्यावर अवलंबून असतो आणि मांस, चरबी, हाडे, मज्जा ह्या स्वरूपात ओळखू येतो. आत्मज्ञान होण्यासाठी हा देह आवश्यक असतो. 

वासना कोष म्हणजे, राग, लोभ, द्वेष, मद, मोह, मत्सर या षड् रिपुंचे आगार. नकारात्मक विचार, इतरांना तुच्छ  मानण्याची प्रवृत्ती, एखाद्याचं नाव बघूनच, ऐकूनच नाक मुरडणाऱ्या व्यक्ती,  नावडतीचं मीठ अळणी विचारसरणी, सुनेला त्रास देणारी सासू, मुलाच्या संसारात उगीच ढवळाढवळ करणारी आई, स्वतःच्या मुलीला सासूचं जास्त ऐकू नको, नवऱ्याला मुठीत ठेव,  असे सांगणाऱ्या काही आया, नवऱ्याचं मानसीक खच्चिकरण करणाऱ्या बायका, लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीचा बलात्कार करणारे पुरुष,   सुनेवर वाईट नजर ठेवणारा सासरा, सासू सासरे कधी खपतील याची वाट पाहणाऱ्या नवविवाहिता, मुलाच्या आईवडिलांना वेस्ट पेपर बास्केट समजणाऱ्या उपवर मुली,  भला उसकी साड़ी मेरी साड़ी से सफ़ेद क्यों असा मत्सर बाळगणाऱ्या रमणी, दागदागिने, कपडालत्ता, सौंदर्यप्रसाधने याला जीव लावणाऱ्या महिला, मोलकरणीने साधा चमचा नेला तरी तो परत मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करणाऱ्या गृहिणी,  कोरोना काळात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणारी व्यक्ती, आणि ते पेशंटला न देता मध्येच लंपास करणाऱ्या नर्सेस, आवश्यक नसलेल्या टेस्ट करायला लावणारे डॉक्टर्स, भ्रष्टाचारी लोकसेवक,  हावरट इच्छा, भीती, भूक आणि इतर अनेक बऱ्यावाईट  इच्छेची उत्पत्ती ह्या कोषात होते आणि ह्या कोषातली वासना जेवढी प्रबळ असते तेवढा वेळ काकस्पर्श व्हायला लागतो. हाच देह मृत शरीरा भोवती घोटाळत असतो. नव्वद टक्के माणसं याच कोषात वावरत असतात.

 मनोमय कोषात मानसीक आंदोलन, सारासार विचार करण्याची कुवत, विवेकबुद्धी, सकारात्मक विचार, संस्कार आणि वासना कोषाला योग्य दिशा देण्याचे आदेश याचा विचार केलेला असतो.हमने माना ये ज़माना दर्द की जागीर है,  हर कदम पे आँसुओं की इक नई ज़ंजीर है,  हे ज्याला कळतं  तो प्रार्थना करतो - मन की किताब से तुम, मेरा नाम ही मिटा देना, गुन तो न था कोई भी, अवगुन मेरे भुला देना.... 

ज्ञानमय  कोष म्हणजे सूक्ष्म देहाला घातलेली साद आणि आत्मिक उन्नती कडे नेणारा मार्ग.  कहते हैं ग्यानी, दुनिया है फानी, पानी पे लिखीं लिखाई,  याचा  प्रत्यय इथे येतो.

 त्यानंतर विज्ञानमय कोष.  सृजनशील आणि आशावादी बनून मृत्यू म्हणजे आनंदाचा सोहळा मानणाऱ्या विभूतींचा हा कोष उन्नत झालेला असतो कारण वासना कोषातून बाहेर पडण्याचा सतत प्रयत्न त्यांनी केलेला असतो. 

त्यानंतर येतो तो आनंदमय कोष. वैश्विक सत्याची जाणिव, आणि प्रत्यक्ष परमात्म्याशी ( परमेश्वर नाही ) संवाद साधण्याची किमया हाच कोष करून देतो. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे हे पटवून देण्याचे काम हा  कोष करतो.  इधर झूम के गाए जिंदगी, उधर है मौत खड़ी ह्याची जाणीव इथे होते.  संत महात्म्यांच्या शरिराभोवती जे वलय किंवा aura दिसते ते सूक्ष्म देहाचे  आणि सात कोषातील आनंदमय कोशाचे आवरण असते. देह हलका होऊन सगळीकडे केवळ आनंदमयी, चैतन्यमयी, सत्यमयी वातावरणच आहे असे वाटू लागते. मृत्यू समयी त्यांचा चेहरा अगदी शांत असतो, ना वेडावाकडा असतो, ना कपाळाला आठ्या असतात. कारण  त्यांनी साद घातलेली असते - " ओ रे मांझी....sss....! मेरे साजन है उसपार... अबकी बार, ले चल पार...." त्यांचा साजन पलीकडच्या तीरावर उभा असतो. न्यायला येणारा नावाडी हसतमुख असतो. तिथे ना डोक्याला शिंगा असणारा यमदूत, ना रेडा. असतो एक दिव्य प्रकाश आणि वाट दाखवणारा वाटाड्या. मै बंदिनी पिया की,  चिर संगिनी हूँ साजन की....आणि अशा वेळी जेंव्हा मृत्यू येतो तेंव्हाच्या क्षणाबद्दल "गुलजार" लिहितात : 

मौत, तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है जो
मिलेगी मुझको, डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने
लगे,जर्द सा चेहरा लिए जब चांद उफक तक पहुंचे, दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब, ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको....

आपण मात्र विचार करत असतो - जिन्होंने सजाये यहाँ मेले, सुख-दुःख संग-संग झेले, वही चुनकर खामोशी
यूँ चले जाएँ अकेले कहाँ.....

आणि जेंव्हा कळतं कि,  ज़िन्दगी तो बेवफ़ा है एक दिन ठुकराएगी,  मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी,  तेंव्हा मृत्यू म्हणजे आनंद सोहळा होतो  कारण आपण विश्वात कुठेतरी असणार आहोत, आपण परत येणार आहोत ह्याची जाणीव होते. मग कशाला मृत्यूची फिकीर करायची? आचार्य रजनीश यांच्या शब्दात म्हणायचं असेल तर, death is a celebration. म्हणून मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल, आप्तांबद्दल शोक करायचा नाही, डोळ्यातून पाणी काढायचं नाही, त्यांना फोटो फ्रेममध्ये  अडकवून भिंतीवर अधांतरी लटकत ठेवायचं नाही. अशामुळे त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. उलट "तू कहीं आसपास है ऐ दोस्त " असाच विचार करावा.  तेराव्या दिवसाचं सेलिब्रेशन पहिल्या दिवशीही करावं. मनातल्या मनात तर नक्कीच करावं. ते आजूबाजूलाच असतात. अडचणीत आपल्याला मार्ग दाखवतात. स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात. त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी ताटलीत तूप आणि भात वाढून आपण बाहेर झाडाखाली ठेवतो ते आपले आप्त येऊन त्याचा आस्वाद घेतील याच श्रद्धेपोटी. 

देहाभोवती असणाऱ्या सात वलयांचं समर्पक संतुलन जी व्यक्ती साधते त्याचं जीवन आणि मृत्यू सप्तस्वरांची सरगम होऊन जाते आणि सप्तरंगाच्या इंद्रधनुष्यात ती व्यक्ती " मैं बंदिनी पिया की, चिर संगिनी हूँ साजन की..." असं गुणगुणत शाश्वत विसावा घेते.

......

 गझवा-ए-हिंद आधारकार्ड बनवताना माझ्या सर्व बोटांचे ठसे आणि डोळ्याच्या बुबुळांचे (आयरिस) ठसे घेण्यात आले. माझे हे  रेकॉर्ड भारत सरकारकडे जमा ...